Pikvima manjur / पीकविमा मंजूर

सुप्रभात.. खरीप २०२२ – “अधिकचे रु.२९३” कोटी Pikvima manjur देण्याचे आपल्या सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिवांचे विमा कंपनीला आदेश.. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंददायी बातमी..दि.२४ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत शेतकरी बांधवांची सविस्तर बाजू मांडून राज्य तक्रार निवारण समिती अध्यक्षांना सूचित करण्यात आले होते.. त्यानुसार “शेतकरी खरीप २०२२ मधील सोयाबीन पिकाची ५०% भारांकन लाऊन देण्यात आलेली नुकसान भरपाई नियमबाह्य असून एक महिन्यात उर्वरित ५०% रक्कम शेतकऱ्यांना वितरित करावी” असे आदेश राज्य तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री.अनुप कुमार यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

पिक विमा यादी पाहण्यासाठी

imoji

इथे क्लीक करा

या निर्णयामुळे विमा कंपनीला खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आणखीन रु.२९३ कोटी वितरित करावे लागणार आहेत.तसेच पंचनाम्याच्या प्रती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे तात्काळ उपलब्ध करून देण्यासह या आधी नाकारलेल्या, प्रलंबित असलेल्या सुचनांची पुनःतपासणी व छाननी करून सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे यापुढे सूचना नाकारल्यास त्याची कारणे स्पष्ट नमूद करावीत असे देखील आदेशीत करण्यात आले आहे.महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताबाबत अतिशय संवेदनशील आहे, हे पुन्हा Pikvima manjur अधोरेखित झाले आहे. अशीच तत्परता व संवेदनशीलता ठाकरे सरकारने त्यावेळी दाखविली असती तर आज खरीप २०२० च्या पीक विम्यासाठी २०२३ पर्यंत संघर्ष करावाच लागला नसता..!#शेती #शेतकरी #पिक #विमा #मदत #धाराशिव #Farming #Farmers #Crop #Insurance #Help #Dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *