shet rasta kayda असा मिळवा तुमच्या शेतासाठी रस्ता

तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कुणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना अर्ज करून उपलब्ध रस्त्यातील अडथळा दूर करता येतो, तहसीलदार यांच्याकडे याविषयी दाद मागता येते.shet rasta kayda असा मिळवा तुमच्या शेतासाठी रस्ता

परंतु तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा वेळी नवीन रस्त्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते. दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमानुसार मागणी करता येते. या व्यतिरिक्त कलम 143 काय आहे, अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता अडविणे, रस्त्यावरून शेतात जाऊन देणे याविषयी कायदेशीर मार्ग कसा काढावा म्हणजेच शेतीच्या रस्त्या विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

१ पूर्वीपासूनच रस्ता उपलब्ध आहे मात्र तो अडविला आहे.
२) शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे आहे. तर या दोन पर्यायांपैकी आज आपण शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता कसा
मिळवावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो किंबहुना तो ओरिजिनल रस्ता मागणी अर्ज pdf स्वरुपात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यामुळे हि प्रक्रिया लवकर समजण्यास तुम्हाला मदत होईल. मित्रांनो पूर्वी शेतजमिनी जास्त होत्या आणि त्या प्रमाणात शेती करणाऱ्यांची संख्या कमी होती. वहीती जमीन कमी व पडीत क्षेत्र जास्त करणाऱ्यांची संख्या कमी होती. वहीती जमीन कमी व पडीत क्षेत्र जास्त असल्यमुळे शेतामध्ये जाण्यायेण्यासाठी रस्त्यांची फारशी अडचण निर्माण
होत नव्हती. सध्या मात्र चित्र एकदम उलटे दिसत आहे, लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढली आहे आणि आपसूकच बेरोजगारी आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे शेती करणाऱ्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे शिवाय आधुनिक तंत्रज्ञानामुळे थोडी जरी जमीन असली तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात उत्पदान शेतकरी काढत आहेत.

परंतु शेतात जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर त्यासाठी आधुनिक शेतीची मशागत वेळोवेळी करावी लागते शिवाय मशागत करून मोठ्या प्रमाणात घेतलेले उत्पादन योग्य वेळी बाजारात नेणे आवश्यक असते आणि ह्या सर्व बाबींसाठी शेतात जाणारा रस्ता असणे खूपच महत्वाचा आहे. तुमच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर नेणे असो किंवा शेतातील उत्पादित माल बाजारात नेणे असे हि सर्व प्रक्रिया करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ते तुमच्या शेतापर्यंत रस्ता असणे खूपच आवश्यक आहे परंतु जर तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही दिला तर मग? मग आपल्या शेतात बियाणे, खते कशी न्यावीत? बैलगाडीणे किंवा ट्रॅक्टरने शेतातील उत्पादित माल बाजारात कसा न्यावा? अशी प्रश्ने तुम्हाला पडलीच असतील. मित्रांनो तुमच्या शेतात जाण्यासाठी तुम्हाला रस्ता पाहिजे असेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे

ही पण बातमी वाचा आधार कार्ड नंबर लिंक करा

४) ज्या व्यक्तीने शेतरात्यासाठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीच्या जमिनीची पूर्वीचे मालक कोणत्या रस्त्याचा वापर करत होते याविषयी चौकशी केली जाते.

५) अर्जदारास शेतरस्ता द्यावयाचा झाल्यास सर्वात जवळचा मार्ग कोणता यावर विचार केला जातो.
६) अर्जदाराला शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय याविषयी चौकशी केली जाते.
७) अर्जदारांनी मागणी केलेला अर्ज हा सरबांधावरून आहे काय याची खात्री करण्यात येते.
८) जर अर्जदाराला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता दिला गेला तर लगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान होऊ शकते याची पाहणी करण्यात येते.
९) अर्जदारास नवीन रस्ता देणे गरजेचे आहे याची खात्री झाल्यानंतर सदरील रस्ता हा लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्यात येतो आणि आशा वेळी लगतच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पहिले जाते.

१०) वरील सर्व बाबींची शहानिशा करून तहसीलदार नवीन शेतरस्ता देण्यासंबधी आदेश अर्ज मान्य करू शकतात किंवा नवीन शेत रस्त्याची मागणी फेटाळू शकतात. इतर कमी किंवा अधिक चौकशी तहसीलदार करू शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *