Subsidy to farmers : एनडीआरएफ’नुसार २०६ कोटी; नव्या प्रस्तावाद्वारे ३५८ कोटींची मागणी अवकाळीचा फटका; निकष बदलले अन् वाढले १५२ कोटी अमरावती : नोव्हेंबरअखेर झालेल्या अवकाळी पावसाने १.८६ लाख हेक्टरमध्ये नुकसान झाले. पंचनाम्याअंती ‘एनडीआरएफ’च्या निकषाने जिल्हाधिकाऱ्यांनी २०६ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती. मात्र, १ जानेवारीच्याशासनादेशानुसार निकष आहेत. त्यानुसार नव्याने ३५८ कोटींची मागणींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.
निकष बदलाने बाधित शेतकऱ्यांना १५२ • कोटींची शासन मदत जास्त मिळणार आहे. मदतीचे वाढीव जिल्हाधिकारी यांनी २०६.३३ कोटींच्या शासन निधीच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तामार्फतडिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाकडे पाठविला होता.जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या दरम्यान सातत्याने अवकाळी पाऊस झाला. यामुळे खरीप, रब्बीसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले होते.
या आपत्तींमध्ये २,९७,९७२ शेतकऱ्यांच्या १,८५,६९६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते व याबाबत दरम्यान हिवाळी अधिवेशनात अवकाळीने बाधित पिकांसाठी वाढीव निकषाने मदत देण्यात येईल, अशीघोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली व तसा शासनादेश १ जानेवारीला काढला. त्यामुळे नव्या निकषाने ३४७.९५ कोटींच्या शासन निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठविला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना १५२ कोटींची मदत जास्त मिळणार याबाबत ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित निकषाने असल्याने दिलासा मिळाला आहे.
Subsidy to farmers : आता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत यापूर्वी दोन हेक्टर मर्यादिचा निकष होता तो आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेला आहे.शिवाय जिरायतीसाठी ८५०० रुपयेbहेक्टरऐवजी १३,६०० रुपये असे मदतीचे दर आहे. पिकाचेहेक्टर होते; निकष बदलाने वाढलेजिरायतीचे बाधित क्षेत्रbयापूर्वीच्या निकषानुसार जिरायती क्षेत्र १,४८,०४३ परंतु वाढीव निकषाने १६८६१३ हेक्टर झाले.
त्यामुळे मदतीची रक्कमदेखीलवाढली आहे. बागायती पिकांचे पूर्वीचे क्षेत्र ७,६७७ हेक्टर होते ते कायम आहे. शिवाय फळपिकाखालील क्षेत्रपूर्वीच्या निकषानुसार २९,९७५ हेक्टर होते, तेदेखील कायम राहिले आहे. यामध्ये मदतीची रक्कम कायमराहिली आहे. तिवसा व चिखलदरा तालुक्यातअवकाळीचे नुकसान निरंक आहे. याशिवाय नांदगाव तालुक्यात जिरायती पिकांचे नुकसानदेखील निरंक
२) बागायतीसाठी १७,००० रुपये हेक्टरऐवजी २७ हजाररुपये हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये हेक्टरऐवजी ३६,००० रुपये प्रति हेक्टर असे मदतीचे वाढीव निकष आहेत. वाढीव निकषाने मिळणारी मदतकोटी, बाधित २२९.३१ जिरायती पिकेकोटी, बागायती २०.७२ पिकांसाठी१०७.९१ कोटी, फळपिकांसाठी मदतकोटी, एकूण ३५७.९५ मिळणारी मदत दाखविण्यात आलेले आहे. बागायतीमध्ये अमरावती, चांदूरबाजार,दर्यापूर चांदूर रेल्वे, धारणी, अचलपूर व मोर्शी तालुक्यात निरंक आहे.