Shetrsta / शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळणार

Shetrsta
शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे व शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने वाचा येथील क्रमांक १ येथील दिनांक २७.२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाचा येथील क्रमांक (२) ते (५) येथीी
शासन शुध्दीपत्रकान्वये योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

ही पण बातमी शेतरस्ता मिळणे साठी असा करा अर्ज

सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन तसेच सदर योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता परिभाषित केलेली नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी
शेत रस्त्यांची कामे होवूनही रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटत नाही. रस्त्याची गुणवता परिभाषित नसल्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यावर फक्त माती टाकली जाते. याने रस्ता रुंद झालेला
दिसून येतो मात्र पाऊस पडल्यावर तेथे चिखल होऊन रस्ता वापरणे दुसह्य होते. तसेच अधिक पाऊस झाल्यास असे मातीचे रस्ते वाहून जातात व केलेल्या कामाचा परिणाम शून्यावर येतो.

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध होतील हे स्वप्न पाहणे आवश्यक आहे. राज्यात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना

ही पण बातमी वाचा आधार कार्ड डाउनलोड करा मोबाईल वर

शासन निर्णय क्रमांकः
मग्रारोहयोतून राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेत रस्ते सुद्धा अन्य महामार्ग एवढेच महत्त्वाचे आहेत. शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले गेले पाहिजेत किंवा बाजारात विकले गेले पाहिजेत. रस्त्या अभावी शेतक-यांना ते करणे शक्य होत नाही. राज्याने निकलते मिकेल असे घोषवाक्य दिले आहे. पावसाळ्यात निघणारी पिक मग आर्थिक दृष्ट्या कितीही फायदेशीर असो रस्त्या अभावी ती पिकवण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता crop diversification ला मोठा अडथळा आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या श्रीमंतीचा मार्ग अवरुद्ध करणारा हा एक मोठा घटक आहे.
म्हणूनच राज्यात सर्वदूर शेतकरी लोक प्रतिनिधींकडे शेत रस्त्याची मागणी करत आहेत. राज्यातील काही जिल्हयात या कामाकडे अधिक लक्ष गेले आहे. त्यामुळे हळू-हळू या कामास वळवळीचे स्वरुप येत आहे. त्यातच आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबास लखपती करण्याचे उद्दीष्ट सुध्दा रुजत चालले आहे. अशा परिस्थितीत शेत/पाणंद रस्ते उच्च गुणवत्तापूर्ण आणि बारामाही वापरायोग्य असणे आवश्यक आहे.


त्यामुळे “पालकमंत्री शेत/पाणंद Shetrsta योजना राबविणेबाबतचा दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ चा शासन निर्णय च वाचा क्र.२ ते ५ येथील शासन शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन शेत/पाणंद रस्ते गुणवत्तापूर्वक तयार करण्यासाठी सर्वंकष बाबी विचारात घेऊन एकत्रित सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. याबाबतच्या प्रस्तावास मा.मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून त्यानुसार शासन खालीलप्रमाणे
निर्णय घेत आहे.

Shetrsta
विविध योजनांच्या अभिसरणागधून “पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यासाठी निर्गमित केलेला वाचा क्र.१ येथील दि. २७/१२/२०१८ चा शासन निर्णय व वाचा क्र. (श ते (५) येथील शासन शुध्दीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.

२. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची
वाहतुक करण्याकरीता, बारमाही वापराकरीता शेत/पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत/पाणंद रस्ते तयार करण्याकरिता “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
“मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना” कार्यक्षमतेने राबविण्यासाठी खालीलप्रमाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *