Reshim Udyog Tuti Lagvad : तुतीची
रोहयोंतर्गत मिळणार अनुदान; विशेष अभियानातून जनजागृती
शेतकऱ्यांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम
उद्योग विकास योजना राबविण्यात
येणार आहे. या योजनेंतर्गत तुती
लागवडीसाठी जवळपास २ लाख १८
हजार रुपये, तर संगोपनगृह
बांधकामासाठी १ लाख ७९ हजार रुपये
असे तीन वर्षांसाठी जवळपास ३ लाख
९७ हजार ३३५ रुपये अनुदान मिळणार १४९
रुपये असे तीन वर्षांसाठी ३ लाख कशासाठी किती अनुदान?
आहे.
Reshim Udyog Tuti Lagvad
९७ हजार ३३५ रुपये अनुदान देण्यात
येणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना चार
लाखांच्या अनुदानासाठी नोंदणी करून
तुती लागवड करता येणार आहे. ज्या
शेतकऱ्यांकडे बारमाही सिंचनाची सोय
आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीननंतर
लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत,
तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा
रेशीम कार्यालयात अर्ज सादर करावेत.
बुलढाणा येथे सादर करण्याचे
आवाहन प्रशासनाकडून करण्यात
आले आहे. पारंपारिक पिकांचे
वातावरणातील बदलामुळे मोठ्या
प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग
करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन
देण्यात येत आहे. त्यातीलच भाग
म्हणून तुती लागवडीसाठी प्रोत्साहन
देण्यात येत आहे.
रेशीम शेती व उद्योग बाढीसाठी
जिल्ह्यात महारेशीम नोंदणी
अभियानाची सुरुवात झाली असून,
यंदा रेशीम शेती पाच हजार एकरापर्यंत
वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात
आले आहे. तुती लागवडीसाठी
शेतकऱ्यांची नोंदणी केली जात असून,
त्यांना अनुदानाविषयी माहिती दिली
जात आहे. हे अभियान २० डिसेंबरपर्यंत
राबविले जाणार आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी
योजनेंतर्गत तुती लागवड अकुशलसाठी
१ लाख ७६ हजार १८६ रुपये, तर
कुशलसाठी ३२ हजार रुपये असे एकूण
२ लाख १८ हजार १८६ रूपये कीटक
संगोपनगृह बांधकामासाठी
अकुशलसाठी ५८ हजार १४९ रूपये
आणि कशलसाठी १ लाख ७९ हजार
अनुदान
■ या महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत रेशीम रथ तयार
करून गावोगावी रेशीम शेतीबद्दल प्रचार प्रसिद्धी
केली जात आहे.
Reshim Udyog Tuti Lagvad : या योजनेतून ३ वर्षांसाठी ३ लक्ष ९७ हजार ३३५ रुपये मजुरी व साहित्यासाठी
दिले जातात. अल्पभूधारक नसलेल्या मात्र रेशीम विकास योजनेचा लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना सिल्क समग्र-२ या योजनेत सहभागी होता येईल.
या योजनेतून तुती लागवड एक एकरासाठी ४५ हजार रुपये, ठिबक सिंचनासाठी
४५ हजार रुपये प्रति एकर, संगोपन गृहासाठी (६० बाय २५ फूट) २ लक्ष ४३
हजार, संगोपत साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये, निर्जंतुकीकरण
साहित्यासाठी ३ हजार ७५० रुपये दिले जातात.
२० डिसेंबरपर्यंत मुदत महारेशीम
अभियानादरम्यान
रेशीम उद्योग योजना
राबविण्यासाठी नोंदणी करता
येणार आहे. त्यासाठी २०
डिसेंबरची मुदत असणार आहे.
या कालावधीत संबंधितांना
रेशीम उद्योगासाठी नोंदणी
करता येईल.
नोंदणीसाठी निकष
अल्पभूधारक शेतकरी असावा.
जॉबकार्डधारक, तसेच सिंचनाची सोय
असावी. एका गावात पाच लाभार्थी
मिळावेत. ग्रामपंचायत ठराव, कृती
आराखड्यात समावेश असणे आवश्यक
आहे. सातबारा, आठ अ, चतुःसीमा नकाशा,
आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स,
पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे आदी
कागदपत्रांसह अर्ज करावा लागणार आहे.