Dharashiv pikvima manjur / पीकविम्यावर सर्वोच्च मोहोर

पीकविम्यावर सर्वोच्च मोहोर.. शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश !!

Dharashiv pikvima manjur जिल्ह्यातील ३.५ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना खरीप – २०२० पीकविमा नुकसान भरपाई ३ आठवड्यात देण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशीलपणे निर्देशित केले आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जपत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. घरोघरी गौरी गणपतीचे पूजन होत असताना या निर्णया मुळे साक्षात देवी लक्ष्मीची पाऊले बळीराजाच्या घरी अवतरली आहेत.

देशभरातील शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अधिक हितकारक करण्यासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयावेळी मा.सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असल्याने, या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. हा दिवस माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंदाचा, अविस्मरणीय व मौल्यवान दिवस आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पीकविमा कंपनीने मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती खंडपीठाने अतिशय संवेदनशील व बारकाईने शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाची संपूर्ण माहिती घेत विमा कंपनीची याचिका नामंजूर केली.

मा.उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मा.सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी बांधवांना न्याय दिला आहे. विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयाकडे जमा केलेले रुपये २०० कोटी, त्यावर जमा झालेले व्याज तसेच शेतकऱ्यांना देय असलेली उर्वरित रक्कम ही विमा कंपनीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

amoznon मध्ये नोकरी

देशभरात प्रथमच पीकविमा नुकसान भरपाई बाबत अशा प्रकारचा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यामुळे, पीकविमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप मिळाला आहे व त्यामुळे बळीराजाला खऱ्या अर्थाने नैसर्गिक आपत्ती पासून पुढील काळात संरक्षण मिळेल.

Dharashiv pikvima manjur

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण देणारी कल्याणकारी, हिताची व कवच देणारी योजना म्हणून पुढे आणली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई मिळण्यावर सर्वोच्च मोहोर झाली आहे.

Shetjmin vatni / शेतजमीन वाटणी साठी फक्त 100 रुपये लागतील

काल दिवसभरात ज्येष्ठ विधीज्ञ यांच्याबरोबर अनेक बैठका घेऊन सुनावणीची नियोजनबद्ध तयारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे या प्रक्रियेत खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले.

राज्य व केंद्र सरकारचे या कामी पुरेपूर सहकार्य होते. जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा, मा.सर्वोच्च न्यायालयातील तज्ञ विधीज्ञ ॲड.श्री.सुधांशू चौधरी व विधीज्ञ ॲड.श्री.राजदीप राऊत यांच्या मेहनतीचे हे फळ आहे.

सत्यमेव जयते!

L

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *