अत्यंत महत्त्वाचे : तक्रार नोंदवूनही Pikvima Nuksan Bharape Arj न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्येच अर्ज करावेत!
खरीप २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने देऊनही सोयाबीन पिक विम्या पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी गावातच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज करावेत.
ही पण बातमी वाचा शेतक-यांच्या खात्यावर होणार जमा
Pikvima Nuksan Bharape Arj
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची विमा कंपनी अथवा कृषी विभागास तक्रार देऊन देखील आजवर विमा रक्कम खात्यावर जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांना यापूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा विमा कंपनी कार्यालयामध्ये तक्रारी अर्ज देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र येथे होत असलेली गर्दी व शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायतीमध्येच अर्ज स्वीकारण्या बाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे तक्रार नोंदवूनही विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार पासून ग्रामपंचायत कार्यालया मध्ये तक्रारी अर्ज करून रीतसर पोहोच घ्यावी.