50 Hajar Niyamit Karjmafi Shetkari : चार वर्षांपासून मिळाले नाही अनुदान
बळी अधिवेशन 2023 मध्ये राज्य सरकारकडून जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण अनुदान जाहीर झाला आणि ते अनुदान शेतकऱ्यांच्या बँक लवकरच जमा होईल असे
महात्मा फुले तरी कर्जमुक्ती योजनेतून नियमित कर्ज
परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना चार
वर्षे उलटूनही प्रोत्साहनपर अनुदान
योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे
प्रामाणिक शेतकऱ्यांनाच
शासन झुलवत असल्याची भावना निर्माण
झाली आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर
लाभासाठी २०१७ ते २०२० या वर्षात
घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाची
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना अ५० हजार रुपयांपर्यंत
लाभ मिळणार होता.
सरकारने कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर अपलोड
केल्या. त्याचे आधार प्रमाणीकरण करून त्यांना कर्जमाफीही मिळाली परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दमडीही हातात पडली
नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. काहींनाच लाभ… या योजनेअंतर्गत नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान जाहीर करण्यात आले खरे, परंतु आतापर्यंत प्रत्येक गावामधून
दोन याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन त्यातही केवळ बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.
https://shetkari.abmarathi.com/traffic-challan-check/
50 Hajar Niyamit Karjmafi Shetkari : थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना
दोन लाखाची कर्जमाफी मिळून नवीन कर्ज देखील मिळाले. परंतु नियमित कर्ज भरणाऱ्यांना शासनाकडून वंचित ठेवले जात असल्याने कर्ज थकविले
असते तर बरे झाले असते, अशी भावना
शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.