1303 कोटी रूपयेची मदत जाहीर
nuksan bharpai 2022
या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे पिके चांगलीच दिसत होती. मात्र शेवटच्या पावसाने हाहाकार माजवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेले पिकं त्यांच्या डोळ्यासमोर नुकसान झाले. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7 जानेवारी रोजी शासनाने 1303 कोटी 49 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. येत्या 2 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल अशी माहिती विभागीय प्रशासनाने केला आहे.
ही पण बातमी वाचा न अतिवृष्टी व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार या महिन्यात बँकांना दिले हे आदेश
या वर्षी अतिवृष्टीमुळे या विभागात 36 लाख शेतकऱ्यांचे 26 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. जिरायती तसेच कोरडवाहूसाठी हेक्टरी 10 हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत महाराष्ट्र शासनाने जाहीर केली होती.
त्या मदतीचा मराठवाड्या तील शेतकऱ्यांना पहिला हफ्ता 1328 कोटी देण्यात आला होता. तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात 1303 कोटी 49 हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. मराठवाड्यासाठी हा निधी जिल्हानिहाय देण्यात येणार आहे.
nuksan bharpai 2022
त्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी 141 कोटी 92 लाख,
अशी प्रकारे देण्यात येणार मदत
जालनासाठी 261 कोटी 13 लाख
परभणी जिल्ह्यासाठी 90 कोटी 20 लाख
हिंगोली जिल्ह्यासाठी 114 कोटी 98 लाख
नांदेड जिल्ह्यासाठी 282 कोटी 56 लाख
बीड जिल्ह्यासाठी 153 कोटी 37 लाख
लातूर जिल्ह्यासाठी 125 कोटी 15 लाख तर
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 133 कोटी 65 लाख रुपये
मदत मंजुर करण्यात आली आहे.