येणारे प्रजासत्ताकदिनी निमित्त शेतकऱ्यांना १० हजार सौर krushi panp वितरणाचे आदेश देण्यात येणार असल्याची महिती व घोषणा ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली आहे.
ठाकरे सरकार कडून किमान समान कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना वीज पुरवठा देण्यास प्राधान्य देण्यात आलेली आहे. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे सौर krushi panp धोरण 2002. यात शेतकऱ्यांना ८ तास वीज पुरवठा देण्याचा महत्वकांक्षी निर्णय ठाकरे सरकारने घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
उर्जा विभागाने सौर कृषी पंप वीज जोडणी धोरण, अपांरपारिक ऊर्जा धोरण व कुसुम अभियान योजना धोरण असे तीन महत्त्वाचे निर्णय मंजूर केले आहे. यामुळे प्रलंबित कृषी पंप वीज जोडणीचा प्रश्न व दिवसा वीज पुरवठयाचा प्रश्न मार्गी लवकरच लागणार आहे. डॉ. नितीन राऊत यांनी उर्जा खात्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर या खात्याच्या अखत्यारीतील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व महाउर्जा या कंपन्यांचा आढावा घेऊन या क्षेत्रातील तज्ञ, ग्राहक व कर्मचारी संघटना, भागदारक यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे